Friday, 26 June 2015

भावना

ऐकवतो ना तूला त्या शब्दांचिया गोष्ट ,
सरळ सरळ लागत नाही लावाण्यासाठी कष्ट ,
मनामध्ये येतात  ग तुटक तुटक अस्पष्ट ,
जोडून बघत असतो तरी अर्थ काढून स्पष्ट . 

एक एक वाक्य जोडून आता बनते आहे गद्य ,
भावना नाही त्यात म्हणे लिहितो आहे पद्य ,

अर्थ आता कवितेचा जुळत नव्हता कडव्यात ,
पहिल्यात होतो , दुसऱ्यात आहे ,
सोबत राहील म्हणून जमत नव्हता तिसऱ्यात . 

सोडून सगळ आता करतो आहे चारोळी ,
पहिली जमते , दुसरी जमते , तिसरीत होते रांगोळी . 

करतो आता नवीन नवीन लिहिण्याच्या वारी ,
बनत चालल्या आता कागदाच्या गोळ्यांच्या माळी ,
हलक्या हाती लिहितो तरी निफ चालली वाकून ,
निजल्या देही म्हणे स्वरांनी कविता म्हणतो रापून …… 


No comments:

Post a Comment