ऐकवतो ना तूला त्या शब्दांचिया गोष्ट ,
सरळ सरळ लागत नाही लावाण्यासाठी कष्ट ,
मनामध्ये येतात ग तुटक तुटक अस्पष्ट ,
जोडून बघत असतो तरी अर्थ काढून स्पष्ट .
एक एक वाक्य जोडून आता बनते आहे गद्य ,
भावना नाही त्यात म्हणे लिहितो आहे पद्य ,
अर्थ आता कवितेचा जुळत नव्हता कडव्यात ,
पहिल्यात होतो , दुसऱ्यात आहे ,
सोबत राहील म्हणून जमत नव्हता तिसऱ्यात .
सोडून सगळ आता करतो आहे चारोळी ,
पहिली जमते , दुसरी जमते , तिसरीत होते रांगोळी .
करतो आता नवीन नवीन लिहिण्याच्या वारी ,
बनत चालल्या आता कागदाच्या गोळ्यांच्या माळी ,
हलक्या हाती लिहितो तरी निफ चालली वाकून ,
निजल्या देही म्हणे स्वरांनी कविता म्हणतो रापून ……
No comments:
Post a Comment