Tuesday, 12 July 2011

आश्रित

पहाटेची वेळ होती नदी काठची वाट होती ,
सूर्याच्या झेपेसंगे सावली अकात होती ,
पाखरे घरट्यात  नव्हती गोठ्यात नव्हत्या गाई ,
साखर झोपेत मी होतो आणि बाहेर पाणी घेऊन आई.

झोप  मोडली कंबर तुटली बाहेराची  उन नाहीरे मला झेपली ,
कशापाई स्वप्नाच लालच तू दिल,
डोंगरावरचा सूर्य बघायचं उगाच राहून गेलं ,

थोडी तरी देरे बुद्धी काही तरी करू ,
आज नाही उद्या नाही परवा तरी करू,

भुताचा विचार करून भविष्याचा पण करून टाकला ,
वर्तमान सारा विचारातच गमावला.
  
काय करू कस करू सांगेल तरी कुणी ,
भविष्य हे भोक  आहे आणि त्या भोकात नाहीरे आम्ही.

टपरी लाऊ टुपरी लाऊ काही तरी विकुरे ,
भविष्यात कधीतरी काहीतरी करूरे ,

कधीतरी काहीतरी कधीचच रहाल ,
आपल्या जीवनात राज्या  काहीच नाही रहाल  .