पहाटेची वेळ होती नदी काठची वाट होती ,
सूर्याच्या झेपेसंगे सावली अकात होती ,
पाखरे घरट्यात नव्हती गोठ्यात नव्हत्या गाई ,
साखर झोपेत मी होतो आणि बाहेर पाणी घेऊन आई.
झोप मोडली कंबर तुटली बाहेराची उन नाहीरे मला झेपली ,
कशापाई स्वप्नाच लालच तू दिल,
डोंगरावरचा सूर्य बघायचं उगाच राहून गेलं ,
थोडी तरी देरे बुद्धी काही तरी करू ,
आज नाही उद्या नाही परवा तरी करू,
भुताचा विचार करून भविष्याचा पण करून टाकला ,
वर्तमान सारा विचारातच गमावला.
काय करू कस करू सांगेल तरी कुणी ,
भविष्य हे भोक आहे आणि त्या भोकात नाहीरे आम्ही.
टपरी लाऊ टुपरी लाऊ काही तरी विकुरे ,
भविष्यात कधीतरी काहीतरी करूरे ,
कधीतरी काहीतरी कधीचच रहाल ,
आपल्या जीवनात राज्या काहीच नाही रहाल .